सुखाने भरलेले ताट समोर असतांना
डोळ्याचा कडा पाणावतात
मायेचे माणस सोबत असतांना
डोळे मात्र भरून येतात
असे का होते हेच मुळी कळत नही.......
मनाची हुरहुर मात्र तशीच राहते
तिन्ही सांजेला उगाच रित रित वाटते
उदास वातावरण अवती भवती राहते
दुखात आकंठ बुडाल्या सारखा वाटते
असे का होते हेच मुळी कळत नही.......
असे का होते ह्याचा मी शोध घेते
उत्तर शोधताना मीच प्रश्नात अडकते
केव्हा तरी हे सगले बंद होईल
असे मीच मला समजावते
तरी पण.....असे का होते हेच मुळी कळत नही.......
No comments:
Post a Comment